आमची प्रेरणा
1.
समग्र
निवडणूक रोख्यांची गाथा
लिहायची,
खरीखुरी, तर,
निव्वळ नागडं
व्हावं लागेल,
कुणालाही.
खरंतर, प्रत्येकालाच.
सबब,
भयग्रस्त सकलजन
आवरणबद्ध.
आरटीआयसुद्धा
कायद्याच्या टणक बंदोबस्तात,
कडेकोट !
-O-
2.
काल रात्री
अंधारलेल्या गल्लीत गाठून
काही बातम्यांना
गळा घोटून ठार मारलं मी.
आज,
कदाचित,
मला झोप लागेल
शांतनिवांत.
-O-
3.
प्रचार संपला
म्हणून प्रचार संपत नाही.
निवडणूक संपली
म्हणून निवडणूक संपत नाही.
सर्वसंहारक मतदान घडून गेलं,
म्हणून कुणाचंच महाभारत संपत नाही.
सरकारस्थापनेनंतरही
शक्यतांच्या हजार शक्यता असतात,
त्यांचं काय करशील ?
-O-
- केशावसुमार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा