आमची प्रेरणा मुकुंद भालेरावांची सुंदर चित्रमय कविता सांज कलताना...
काल घेतलेल्या काल
विसरल्या आणाभाका...
सांज कलताना पुन्हा
प्याले भरून दे माका..
तुझं हसणं नाचणं..
डोळा भरून पाहणं..
लटपटत्या पायांनी
माडीवर येणं जाणं...
पण कशी ही पायरी
रोज देई मला धोका.
घरी जाण्यानं उदास...
माझ्या साऱ्या आठवणी...
आज बर्फावर प्याली
नाही मिसळलं पाणी..
झुले आज मी जसा की
आमराईतला झोका..
झाला दारात तांडव...
बयो हाती सरपण...
माझं तुडवलं अंग...
माझं बांधलं सरण...
बेशुद्धीत घेतल्या मी
पुन्हा साऱ्या आणाभाका...
Saturday, February 2, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment