आमची प्रेरणा अदितीताईंची सुंदर कविता ठसा
त्या संध्याकाळी मेघ रुपेरी होते
ती घरात मजला आणि एकटी दिसते
खिडकीत दिव्याचा उजेड येऊन गेला
तो तर होता संदेश तिचा आलेला
झाडाची फांदी खिडकीपाशी होती
ती चढून गेलो, प्रिया मिठीत होती
ही वेळ अशी वैरीण साधला दावा
का बाप तिचा पण तेव्हाच तिथे यावा
पायांचे करूनी शस्त्र धुलाई होई
ऐकतो अजून तो पदरव कानी येई...
शांतता कशी? गोंगाट कुठे तो गेला?
त्या पायांचा हा ठसा मात्र उरलेला!
--केशवसुमार
(१० ऑगस्ट २००७,
आषाढ कृ. १२ शके १९२९)
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment