आमची प्रेरणा जयंतरावांची गझल असहाय
भात हा नुसता असा मी घेत नाही
मागतो सांबार कोणी देत नाही
खीर माझी संपली आहे कधीची
वाढपी माझ्याकडे का येत नाही?
भागली नाहीच तृष्णा काल माझी
आज बासुंदी पुरीचा बेत नाही?
वाढलेले सर्व मी खाऊन जातो
मी घरी बांधून काही नेत नाही
लाडवांचा ढीग हा ताटात माझ्या
पैज लावा, हारणे मज येत नाही
वागतो "केशवा" तू हावऱ्या गत
ह्या मुळे कोठे तुला मी नेत नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा