आमची प्रेरणा जयन्तरावांची सुरेख गझल ऋतू येत होते ऋतू जात होते- ५
ऋतू येत होते ऋतू जात होते
मला काय सांगा नवे होत होते
जुना तोच साकी जुनी ती सुराही
नव्याने पिणारे गटारात होते
कधी ऐकलेना पसरले कुठेही
जरी लोक सारेच प्रख्यात होते
सदा ओढणी ओढशी का तिची तू
असे काय त्या ओढणीच्यात होते
मदीरा इथे मी किती प्यायली ही
घरी जायचे हे कुणा ज्ञात होते
उतारा अता द्या मला आज कोणी
किती प्यायलो हे कुणा ज्ञात होते
न प्रतिसाद आला कुणाचा कधीही
कमी "केशवा" काय काव्यात होते?
(केशसुमार६९)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा