एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, १३ मार्च, २००७

"तरही" गझल -२

आमची प्रेरणा कामिनी केंभावी यांची "मायबोली" वर वैभव जोशींनी घेतलेल्या गझल कार्यशाळेतली गझल "तरही" गझल

ऋतू येत होते, ऋतू जात होते
कशी नेहमी मीच गोत्यात होते

तुझा खेळ झाला पुन्हा पावसाचा
अता वाहते नीर नाकात होते

उसाच्या रसा काढण्या वेळ झाला
तुला वाटले मी गरे खात होते

इथे कोण माझी न तक्रार करतो
(तसे सर्व साहेब नात्यात होते)

कितीदा रडीने पुन्हा खेळ मोडू?
असे फालतू डाव हातात होते

अता "केशवा" हे उगा दाखले का?
तुझ्या कोठल्या त्राण काव्यात होते?

केशवसुमार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: